School Education on MNS Post| शाळातील मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण व्हावे, देशभक्ती निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा घेतली जाते. यापुढे आता “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमित म्हटले जाणार आहे. त्यासंदर्भात शासनाकडून आदेश काढण्यात आले आहे.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मागणी केली होती. मनसेने यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून प्रत्येक शैक्षणिक संस्थेत राज्यगीत वाजवलं पाहिजे अशी आग्रही मागणी केली होती. याप्रकरणी आता राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलेले आहे.
मनसेची पोस्ट
यानंतर मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे गीत राज्यगीत म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकारून १ वर्ष उलटल्यानंतरही या गीताला त्याचा उचित सन्मान मिळत नव्हता. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत आपलं हे राज्यगीत गायलं वा वाजवलं जात नव्हतं! महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. अमितजी ठाकरे यांनी यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी – २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांना पत्र लिहून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि प्रत्येक शैक्षणिक संस्थेत राज्यगीत वाजविले/ गायिले जावे अशी आग्रही अपेक्षा व्यक्त केली. School Education on MNS Post|
“जय जय महाराष्ट्र माझा…” हे गीत राज्यगीत म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकारून १ वर्ष उलटल्यानंतरही या गीताला त्याचा उचित सन्मान मिळत नव्हता. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत आपलं हे राज्यगीत गायलं वा वाजवलं जात नव्हतं! महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय… pic.twitter.com/naR9wwYKRy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 17, 2024
अमितजींच्या या पत्राचा सकारात्मक परिणाम शासन दरबारी झाला. पत्रानंतर तीन आठवड्यांच्या आतच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शासन आदेश / परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, “सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत दैनिक सत्र (दररोजचे वर्ग) सुरू होताना राष्ट्रगीत/ प्रार्थना यांसोबत राज्यगीत वाजवले/ गायले जाईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यायची आहे आणि या सूचनेचे पालन होत आहे ना, याची दक्षता सर्व विभागीय शालेय शिक्षण उपसंचालकांनी घ्यायची आहे!”
सन्माननीय श्री. अमितजी ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे राज्यातील शाळांमध्ये राज्यगीताचा सन्मान होत नसल्याची बाब राज्य सरकारच्या, विशेषत: शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आली. म्हणूनच शालेय शिक्षण विभागाने हे परिपत्रक काढले असून आता यापुढे प्रत्येक शाळेत निनादणार “जय जय महाराष्ट्र माझा…!” मनविसेमुळे प्रत्येक शाळेत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’!!” अशी पोस्ट मनसे ट्वीटर अर्थात एक्सवर शेअर केली आहे.
हेही वाचा:
ठाकरेंचा पुन्हा शिंदेंवर जहरी टीका,’दर आठवड्याला एक माणूस फोडा, त्यामुळेच तर…’