घाझीपूर (उत्तर प्रदेश) : बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थी, कार्यकर्ते आणि पत्रकारांनी घाझीपूर जिल्हा कारागृहात उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन उत्तर प्रदेश प्रशासनाच्या विरोधात सुरू करण्यात आले आहे.
एका महिला पत्रकारासह 10 जणांच्या पथकाने सत्याग्रह यात्रा काढली. त्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. त्यांना 14 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. गोरखपूर जवळील चौरी चौरा येथून त्यांची यात्रा सुरू झाली. ती राजघाटाजवळ संपन्न होणार होती. मात्र, या यात्रेच्या नवव्या दिवशी 11 मार्चला या पथकाला अटक करण्यात आली. त्यांच्यावर सुधारीत नागरिकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिकत्व पट (एनआरसी) बाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यातून समाजात अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला.
दरम्यान, बनारस हिंदू विद्यापीठातील आयआयटीचा विद्यार्थी असणारे दिवाकर सिंह यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ते या यात्रेत सुरवातीला सहभागी झाले होते. ते म्हणाले, शांती आणि सद्भावनेसाठी आम्ही ही यात्रा काढली होती. हिंदू मुस्लिम विभाजनाविरूध्द ती होती. प्रेम आणि अहिंसा हेच सामन्य जीवनासाठी आवश्यक आहे, हा संदेश आम्हाला द्यायचा होता. बरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि मुलभूत हक्कांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी होणारे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या यात्रेने उत्तर प्रदेश पोलिसांनी का कायद्याविरोधातील निदर्शकांवर केलेल्या अन्यायाचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 16 फेब्रुवारीला येत आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली असावी, असे आरोप केले जात आहेत.
या आंदोलकांच्या जामीनासाठी अशा जाचक अटी ठेवल्या आहेत, की त्यांना जामीन मिळूच नये. अडीच लाखाचे दोन व्यक्तीगत जातमुचलके आणि दोन राजपत्रीत अधिकारी जामीनदार म्हणून हवेत अशी अट ठेवली आहे. सरकारच्या विरोधात जाऊन कोणता सरकारी अधिकारी जामीन देईल, असा सवाल या महिला पत्रकाराच्या भगिनीने केला आहे.