कोलकाता – तृणमुल कॉंग्रेसने बुधवारी आपला लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास सीएए कायदा रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. (TMC Lok Sabha polls manifesto promises repeal of CAA, 10 gas cylinders for BPL families yearly)
येथील पक्षाच्या मुख्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध करताना, टीएमसीचे राज्यसभेतील नेते डेरेक ओ’ब्रायन म्हणाले, ही वचने आहेत जी आम्ही इंडिया आघाडीचा भाग म्हणून पूर्ण करू, आम्ही किंमत स्थिरीकरण निधी तयार करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे वचन देतो.
आम्ही नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) रद्द करण्याचे आणि देशातील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) काम थांबविण्याचे वचन देतो,असे ज्येष्ठ टीएमसी नेते अमित मित्रा यांनी यावेळी सांगितले. पक्षाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना घरपोच रेशन आणि १० मोफत स्वयंपाक गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासनही दिले आहे.
तृणमुल कॉंग्रेस पक्ष बंगालमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असला तरी आम्ही केंद्रात इंडिया आघाडी बरोबरच राहणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.