Pinarayi Vijayan criticize RSS| केरळचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (माकप) वरिष्ठ नेते पिनराई विजयन यांनी मोठा दावा केला आहे. ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ या घोषणा दोन मुस्लीम व्यक्तींनी दिल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही घोषणांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याग करणार का?’ असा सवाल विजयन यांनी केला आहे. त्यांच्या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मुस्लिम लोकांची अधिक संख्या असलेला हा जिल्हा आहे.
पिनराई विजयन म्हणाले की, “अजीमुल्ला खान नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीने ‘भारत माता की जय’चा नारा दिला होता. याठिकाणी आलेल्या काही संघातील नेत्यांनी आपल्या समोर असलेल्या लोकांना ‘भारत माता की जय’ ची घोषणा देण्यास सांगितलं होतं. ही घोषणा पहिल्यांदा कोणी दिली होती? मला माहिती नाही की संघातील लोकांना याची माहिती आहे का नाही, पण ही घोषणा पहिल्यांदा अजीमुल्ला खान यांनी दिली होती. ही घोषणा एका मुस्लीम व्यक्तीने दिली आहे. त्यामुळे संघ परिवार या घोषणेचा त्याग करणार का?” असा सवाल विजयन यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “राजकारणातील एक जुने नेते आबिद हसन यांनी सर्वात आधी ‘जय हिंद’चा नारा दिला होता. तसेच मुघल सम्राट शाहजहाँ यांचा मुलगा दारा शिकोह याने मूळ संस्कृतमधील ५० पेक्षा अधिक उपनिषदांचा फारशी भाषेमध्ये अनुवाद केला होता. त्यामुळे भारतीय धर्मग्रंथ जगभरात पोहोचण्यासाठी मदत झाली. भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवू इच्छिणाऱ्या संघ परिवारातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना याची माहिती असणे आवश्यक आहे,” असं देखील विजयन म्हणाले.
सीएएच्या संदर्भात विजयन यांचे भाष्य
सीएएच्या संदर्भात देखील विजयन यांनी भाष्य केले आहे. “केंद्रातील आरएसएसच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सीएएच्या अंमलबजावणीद्वारे देशातील मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनविण्याचा प्रयत्न करत आहे. पण केरळमधील लोकशाही जागरूक जनता कोणत्याही किंमतीवर हे पाऊल स्वीकारणार नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वगळता जगातील कोणत्याही देशाने धर्माच्या आधारावर निर्वासितांची विभागणी केलेली नाही.”
हेही वाचा:
हटके प्रचार…! “मुलाच्या लग्नात ‘गिफ्ट’ आणू नका पण, मोदींना ‘मत’ द्या”लग्नपत्रिका ‘व्हायरल’