नवी दिल्ली : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सिक्कीममध्ये भूस्खलन झाल्यामुळे काही ठिकाणचे रस्ते बंद झाल्यामुळे बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. अडकलेल्या तीन हजारहून अधिक पर्यटकांची सुटका केली आहे. या पर्यटकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागातील रस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आत्तापर्यंत भारतीय लष्कराने अडकलेल्या 3 हजार 500 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले आहे.
Sikkim | The first bus with 19 men, 15 women and 4 children departed from the landslide hit Pegong in Mangan district, for the state capital Gangtok. A total of 72 tourists evacuated so far in two buses: Sikkim Police
(Photos: Sikkim Police) pic.twitter.com/YMxt9INUPF
— ANI (@ANI) June 17, 2023
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दोन हजार पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. 1500 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंगसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे लोक अडकलेले होते.
जिल्हा प्रशासनाकडून पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी 19 बस आणि 70 छोटी वाहने तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत तीन बस आणि दोन अन्य वाहने 123 पर्यटकांना घेऊन राज्याची राजधानी गंगटोककडे रवाना झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे काही राज्यांप्रमाणे सिक्कीममध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. गुजरातला धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम पूर्व भारतातील राज्यांवर होताना दिसत आहे.