नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये पावसा धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे याठिकाणची संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये झाले आहे. तर अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनादेखीस घडल्या आहेत. मुसळधार पवासामुळे येथे पुरस्थिती निर्माण झाली आसून या संकटामुळे आतापर्यंत २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण बेपत्ता असून बचाव पथकाच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जात आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस असून येथे ३४ ठिकाणी भूस्खलन तसेच पुरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब-हिमाचाल प्रदेश सीमेजवळ कांग्रा जिल्ह्यात असलेला एक रेल्वे रुळदेखील कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे येथे नदीला पूर आला होता. याच कारणामुळे हा पूल कोसळला आहे.
हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असून येथील सर्व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय उत्तराखंडमध्ये सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचा धोका वाढला आहे.
सध्या हिमाचल प्रदेश राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील आठवडाभर अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांप्रती मुख्यमंत्री जयमराम ठाकूर यांनी शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासन, बचाव व पुनर्वसन विभागाला जलद गतीने मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. हिमचाल प्रदेशमधील सध्याची पुरस्थिती लक्षात घेऊन येथील राज्य प्रशासनाने शनिवारी तातडीची बैठक घेऊन २३२ कोटींचा आपत्कालीन निधी मंजूर केला आहे. सध्याच्या पुरस्थितीमुळे येथील एकूण ७४२ रस्ते बंद करण्यात आले आहेत.