चिंबळी -महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने सोयाबीनची वाढ खुंटली होती. परंतु दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व उष्णता निर्माण झाल्यानंतर शुक्रवारी (दि. 31) दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली.
या पावसाने सोयाबीन, वाल, भात आदी पिकांना जीवदान मिळणार आहे. चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरातील शेतकरी सुखावला आहे.