मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला देखील डिवचले.
तसेच मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला हात घालत मनसैनिकांना हनुमान चालीसाचे स्पीकर लावण्याचं आवाहन केलं. राज ठाकरेंच्या या भाषांतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तर भाजप नेत्यांनी त्यांचा भाषणाला पाठिंबा दिला आहे. यातच आता नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी “भारतात स्पीकरवर हनुमान चालिसा लावायची नाही मग काय पाकिस्तानात लावायची का ?” असा प्रश्न ठाकरे सरकारला विचारला आहे.
त्यांनी या मुद्यावरून फेसबुक पोस्ट केली आहे की,”जर तुम्ही भारतात हनुमान चालीसा वाचत नसाल तर पाकिस्तानात वाचाल का??????
महाराष्ट्रात स्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण केल्यास महाराष्ट्र सरकार दंड आकारत आहे, मग कर्ण कर्कश आवाजात पाठ केलेल्या अजानमधून शिक्षा का वसूल करत नाही? असा भेदभाव का? मंत्री हिंदू, अधिकारी हिंदू…..दुर्दैव घोर कलियुग” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.