पिंपरी (प्रतिनिधी) – विराज जगताप याचा खून हा जातीयवादातून झाला आहे. असे प्रकार रोखण्यासाठी यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी केली आहे.
पिंपळे गुरव येथे नुकतीच विराज या तरुणाची हत्या केली होती. विराजच्या कुटुींयांचे सांत्वन करण्यासाठी दीपक निकाळजे यांनी आज जगताप कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, रिपाइंच्या कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहे पवार, पुणे जिल्हाध्यक्ष अमित वर्मा यांच्यासह विविध पदाधिकारी व रिपाइंचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
जगताप कुटुींयांची भेट घेतल्यानंतर निकाळजे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ते म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी जातीयवादातून खुनाचे प्रकार घडत आहेत. जगताप याचा खूनही जातीयवादातूनच घडला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिद्ध आहे. जोपर्यंत यातील आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्हीही स्वस्थ बसणार नाही. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून आरोपींना फाशी व्हावी यासाठी राज्य शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी आमची मागणी आहे.
रिपाइंच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था पाळून आपल्या भावना राज्यकर्त्यांपर्यंत तसेच प्रशासनासमोर मांडाव्यात. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने देणार आहोत. दलित संरक्षणासाठी रिपाइंच्या माध्यमातून लढा उभारला जाईल तसेच जगताप कुटुंबीयांच्या पाठीशी सर्व प्रकारची ताकद रिपाइंच्या माध्यमातून उभी केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम म्हणाले.
…तर कायदा हातात घेऊ
विराजच्या कुटुींयांना न्याय देण्यास उशीर केल्यास अथवा राज्यात पुन्हा अशी घटना घडल्यास आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. दलितांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिद्ध आहोत. राज्यकर्ते आणि पोलिसांनी दलितांवर होणारे अन्याय रोखावेत अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशाराही निकाळजे यांनी या वेळी दिला.