Hafiz Saeed : मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईद हा सध्या पाकिस्तानमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत मागील अनेक वर्षांपासून प्रयन्त करत आहे. त्यातच पुन्हा एकदा भारताने हाफिज सईद याच्या प्रत्यापर्णाची मागणी पाकिस्तनकडे केली आहे. दरम्यान, भारताच्या या मागणीवर आता पाकिस्तनकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पाकिस्तानने भारताने लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईद 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि संयुक्त राष्ट्र प्रतिबंधित दहशतवादी याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. हाफिज सईद अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये भारतीय तपास यंत्रणांना हवा आहे. त्याविषयीपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या सईदच्या प्रत्यार्पणाच्या मागणीशी संबंधित कागदपत्रे अलीकडेच इस्लामाबादला पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली होती.
तसेच बागची यांनी, “आम्ही या प्रकरणी आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह आमची मागणी पाकिस्तान सरकारकडे पाठवली आहे.” असे म्हटले आहे. या मुद्द्यावर टिप्पणी करताना पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी ,”पाकिस्तानला “तथाकथित मनी लाँडरिंग प्रकरणात” सईदच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून विनंती प्राप्त झाली होती.
पुढे बोलताना त्यांनी , “या बाबतीत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की पाकिस्तान आणि भारतामध्ये कोणताही द्विपक्षीय प्रत्यार्पण करार नाही.” नवी दिल्लीचा इस्लामाबादसोबत प्रत्यार्पण करार नाही. दरम्यान, या प्रकरणात अशा फ्रेमवर्क कराराच्या अनुपस्थितीत देखील प्रत्यार्पण शक्य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. तसेच हाफिद सईद हा कट्टरपंथी मौलवी आहे, त्याला जुलै 2019 मध्ये दहशतवाद विरोधी विभागाने (CTD) त्याच्या आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध 23 FIR नोंदवल्यानंतर अटक केली होती.
एप्रिल 2022 मध्ये दहशतवादविरोधी न्यायालयाने दोन दहशतवाद्याना वित्तपुरवठा प्रकरणांमध्ये त्याला 33 वर्षांची एकत्रित शिक्षा सुनावली होती. सईदच्या नेतृत्वाखालील जेयूडी ही लष्कर-ए-तैयबा (LeT) ची आघाडीची संघटना आहे, जी 2008 च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार आहे. या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह 166 जणांचा मृत्यू झाला होता.