फलटण – सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील आडते व खरेदीदार, श्रीमंत शिवाजीराजे फळे व भाजीपाला मार्केटमधील विक्रेते, भूसार असोसिएशन, संचालक मंडळ, हमाल, मापाडी, गाळेधारक व इतर घटकांसह बाजार समितीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमा केलेले धान्य, पाणी, साखर, रवा, बेसण, बिस्कीटपुडे, चटण्या, तेल, भाजीपाला कोल्हापूरकडे रवाना केला.
बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन भगवानराव होळकर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण सुनिल धायगुडे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, संचालक मोहनराव निंबाळकर, संजय कदम, परशूराम फरांदे, प्रकाश भोंगळे, बाळकृष्ण रणवरे, समर जाधव, बापू करे, भाजीपाला मार्केट बाळासाहेब ननावरे, मंजूर बागवान यांच्यासह शेतकरी, व्यापारी, आडते, खरेदीदार यांच्या उपस्थितीत मदतीने भरलेली वाहने कोल्हपूर येथील आ. अमल महाडिक व कोल्हपूर जिल्हा परिषद अध्यक्षा शौमीका महाडिक यांच्याकडील मदत कक्षाकडे रवाना करण्यात आली.
या वाहनांमध्ये प्रामुख्याने तीन टन तांदुळ, 100 बॉक्स बिसलरी पाणी, 250 किलो फरसाण, 100 किलो साखर, 300 किलो रवा, 100 किलो बेसन, 10 किलो बारिक मीठ, 200 किलो तुरडाळ, 100 पारले बिस्कीट बॉक्स, 300 किलो गव्हाचे पीठ, 10 किलो चटणी, 25 डबे तेल, 20 बॉक्स डाळींब, 20 पोती बटाटा, 5 पोती कांदा, 50 किलो लसूण, 1 पोते आले, 2 पोती ढब्बु मिरची, 2 पोती शेवगा, 5 पोती वांगी, 5 कॅरेट भोपळा, 10 पोती फ्लॉवर, 4 पोती कोबी, 500 किलो भाजीपाला वगैरेंचा समावेश होता.
बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी बाजार समितीमधील सर्व संबंधीत घटकांना पूरग्रस्तांना मदत देणे विषयी आवाहन केल्यानंतर बाजार समितीच्या आवारातील सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू व धान्य बाजार समितीकडे सुपूर्द केले. त्याची नोंदणी करुन सर्व वस्तू, धान्य, तेले वगैरे कोल्हापूरकडे अनेक वाहनातून पाठविण्यात आल्या.
तेथे खास उभारण्यात आलेल्या मदत कक्षातून सदरच्या वस्तू, धान्य, तेले, पाणी, गरजेच्या ठिकाणी पाठवून वितरित करण्यात येणार आहेत. बाजार समितीच्या आवारातील सर्वच घटकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल बाजार समितीच्यावतीने सर्वांना धन्यवाद देण्यात आले.
या कार्यक्रमास प्रजन्य अहिवळे, संतोष सस्ते, संभाजी घोरपडे, सोमनाथ निकम, चंद्रकांत जगताप, युवराज गायकवाड, चेतन घडिया, रुपचंद दोशी, सचिन दोशी, राजेंद्र सुर्यवंशी, राजेश शहा, राजकुमार मेहता (पिंपोडकर), बुवासाहेब भोसले, राजेंद्र बरडे, रविंद्र चव्हाण, धनेश शहा, अजितकुमार दोशी, मनसुखलाल शहा, अरविंद वीर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.