मुंबई – राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला येलो अलर्ट दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील आहे. असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला.
ते पुढे म्हणाले की, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत. राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने तिहेरी संकटात सापडला असल्याचा घणाघात देखील अजित पवार यांनी केला.
हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- मुख्यमंत्री शिंदे
तसेच राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीही विधाने करुन अकलेचे तारे तोडत असल्याचे सांगून कृषी मंत्र्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.