मुंबई – भारताच्या लसीकरण मोहिमेत सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीनचा सामावेश आहे. या दोन्ही लसी भारतीय करोना व्हेरियंटवर प्रभावी असल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे.
लसीकरणानंतर संसर्ग झाला तरीही अत्यंत सौम्य लक्षणे दिसून येतात. एकीकृत जैवविज्ञान संस्थेने याविषयीच्या अभ्यासाच्या प्राथमिक निष्कर्षावर हा अहवाल दिला आहे.
संस्थेचे संचालक अनुराग अग्रवाल म्हणाले की, लसीकरणानंतर करोनाचा संसर्ग झाल्यास त्यामुळे रुग्णाच्या जिवाला सहसा धोका पोहोचत नाही. संसर्गाची लक्षणे अगदी सौम्य राहतात.
भारतात सध्या डबल म्युटंट विषाणूचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे बोलले जात आहे. भारतीय लसीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन्ही लसी या विषाणूवर प्रभावी आहेत.
लसीकरणानंतर दोन प्रकारच्या अँटिबॉडीज तयार होतात, हे अभ्यासात पुढे आले आहे. 20 टक्के ते 98 टक्क्यांपर्यंत अँडिबॉडीज मिळाल्या आहेत. त्यामुळे करोनाचा सामना करण्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे.