बारामती – नीरा नदीवरील मेखळी-गोखळी पुलाला पुराच्या पाण्यामुळे तडे गेले आहेत, त्यामुळे बारामती-फलटण तालुक्याला जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
धरण भागात कोसळत असलेल्या पावसामुळे वीर धरणातून 1 लाख10 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नीरा नदीला पूर आला आहे. या पुराचा तडाखा नदीकाठच्या गावांना बसला आहे. नदीकाठची गावे पाण्याखाली गेली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 1992 मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली तर 1995 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. धरण भागात कोसळलेल्या पावसाच्या पाण्याचा तडाखा या पुलाला बसला असून तडे गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. तरी पुलावरून वाहतूक अद्यापही सुरूच आहे.