मुंबई – राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. एवढेच काय तर शिंदेसह बंडखोर आमदारांनी 50 खोके घेतल्याचा आरोप देखील करण्यात आला. यावरून अनेक आरोप- प्रत्यारोप झाले. यावरून ’50 खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणा देत ठाकरे गटातील नेत्यांनी दिसतील तिथे शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली. या टीकेनंतर या आमदारांची खूप मोठ्या प्रमाणात बदनामी झाली, यामध्ये काही शिवसेना आमदार तर काही अपक्ष आमदारही सामील होते. यात मंत्रीपदाची आस असलेले आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता.
आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन आपल्याला काय मिळाले याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’सांगली येथे एक कार्यक्रमा दरम्यान आमदार बच्चू कडू बोलतांना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी दहावेळा दिव्यांग मंत्रालय उभारा ही मागणी केली. राज्यमंत्री असूनही माझी मागणी पूर्ण झाली नाही, मात्र, योगायोगाने गुवाहाटीला जाण्याचा योग आला. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी फोन करून आपल्यासोबत यावं असे म्हटले. त्यावेळी मी तुमच्यासोबत येतो पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करत असाल तरच येतो नाही तर तुमच्यासोबत येत नाही असे मी निक्षून सांगितले असे त्यांनी सांगितले.
मी दुसऱ्यांदा गुवाहाटीला गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की तुम्हाला दिव्यांग मंत्रालय स्थापन करायचा शब्द पूर्ण करायला हवा. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्य सचिवांना फोन केला. त्यावेळी त्यांना कॅबिनेटची नोट बनवायली सांगितली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच दिव्यांग मंत्रालय मिळाले असा दावाही त्यांनी केला.