नगर – शहरातील कित्येक वर्षापासून प्रलंबीत असलेला उड्डणपुलाचे काम लवकरच सुरु होणार असल्याने या उड्डाण पुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे, व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन दिले. यावेळी अध्यक्षा रेखा जरे पाटील, मनिषा गायकवाड, रोहीणी पवार, जया वाळेकर, रोहीणी वाघीरे आदी उपस्थित होत्या.