श्रीनगर: राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे आज काश्मीर दौऱ्यासाठी रवाना झाले होते. परंतु सुरक्षा यंत्रणेकडून आझाद यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आलं आणि नंतर माघारी पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरकॉंग्रेसचे अध्यक्ष गुलाम अहमद हेही त्यांच्यासोबत होते. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळेच आझाद यांना परत पाठवल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा सुरूवातीपासूनच आझाद यांनी विरोध केला आहे त्यामुळे त्यांच्यामुळे राज्यातील परिस्थिती चिघळू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.