पुणे : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन झाले होते. गेली दहा दिवस देशभर आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर आज अनंत चतुर्दशी दिवशी देशभरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…, गणपती चालला गावाला चैन पडेना जीवाला…, अशा घोषणा देत भाविक गणरायाला भावपूर्ण निरोप देत आहेत. यादरम्यान गणपतीचे आकर्षक फोटो समोर आले आहेत..