नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात चार नवीन न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या नियुक्त्यांमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची एकूण संख्या आता 34 झाली आहे.
सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी नवीन न्यायाधिशांना शपथ दिली.कृष्णा मुरारी, एस. रविंद भट, व्ही रामसुब्रमण्यम, आणि श्रृषिकेष रॉय अशी या नवीन न्यायाधिशांची नावे आहेत. यातील न्या. मुरारी आणि न्या भट हे पंजाब आणि हरियाना हायकोर्टाचे न्यायाधिश म्हणून काम करीत होते. तर रामसुब्रमण्यम हे हिमाचालप्रदेशातील उच्च न्यायालयात कार्यरत होते. रॉय हे केरळ उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून कार्यरत होते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या जागा त्वरीत भरल्या जाव्यात असे पत्र सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी थेट पंतप्रधानांना पाठवले होते. त्यानंतर या न्यायाधिशांच्या नियुक्त्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजुर केला आहे.