शिंदे वासुली -चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कंपनी कामगार, मजूर, व्यावसायिक भाडेकरू म्हणून राहतात. परिसरातील गावांमधील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानावर नेहमीच होणारी गर्दीच्या पार्श्वभूमीवर वासुली, सावरदरी गावांनी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी टप्प्याटप्प्याने 100 टक्के गाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वराळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी 14 एप्रिलपर्यंत गावबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
बंदच्या काळात गावातील सरकारी व खासगी दवाखाने, मेडिकल्स वगळून सर्व दुकाने 100 टक्के दुकाने बंद असणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या व सामाजिक आरोग्यास बाधा पोहोचविणाऱ्या व्यक्तीवर संचारबंदी व जमावबंदी कायद्यानुसार व नोटीसाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई करणार असल्याचे सरपंच बेबीताई बुट्टे, उपसरपंच सागर आंद्रे व ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांनी सांगितले.
दरम्यान, महाळुंगे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण यांनी भेट देऊन ग्रामस्थांना संचारबंदीबाबत कडक सूचना देऊन नियम मोडणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी सरपंच विश्वास बुट्टे पाटील, उपसरपंच सागर आंद्रे, सुरेश बुट्टे पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.