मुंबई – राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिकांची नासाडी झाली. आधीच हमीभाव मिळत नसल्याने मेटाकुटीला आलेला शेतकरी आता निसर्गाच्या लहरी हवामानामुळे खचला आहे. याप्रश्नी सभागृहात गोंधळ सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांना आवाहन केले आहे.
“हो, मी घरी बसून कारभार केला. पण आता तुम्ही बांधाबाधांवर जा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या, असे ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर त्यांनी आज मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर, रवींद्र धंगेकर, आदित्य ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Beed : कांद्याला भाव नाही, कर्ज फेडीच्या विवंचनेतून युवा शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
“विरोधक एकत्रित येवून लढले तर आपण जिंकू शकतो, असा विश्वास यावेळी ठाकरे यांनी बोलून दाखविला. तसंच, पुढच्या निवडणुका याचपद्धतीने काम करून जिंकूया, असे सांगून त्यांनी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या विजयाचीही आठवण काढली.
मदत शेतकऱ्यांच्या दारात पोचवा….
अवकाळी पाऊस आपल्याला लागलेला शाप आहे. नैसर्गिक संकटे येत असतात. ती टाळू शकत नाहीत. अशावेळेला शेतकऱ्यांना मदत करणे, आधार देणे सरकारचे काम आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. तो राबला नाही, त्याने पिकवले नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही.
#MahaBudget2023 : आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार
तत्काळ पंचनाम्याचे आदेश देणे हे शासकीय आदेश आहेत. तसे मीही दिले होते. परंतु, आपली मदत शेतकऱ्यांच्या दारात पोहोचते आहे की नाही हे पाहावे लागते. निकषापलिकडे जाऊन आम्ही चक्रीवादळावेळी मदत केली होती. त्यामुळे आताही कोणतेही निकष न पडताळता तातडीने शेतकऱ्यांना आधार द्या, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.