4 फुटांनी पाणी झाले कमी
सातारा – कराड शहरात कृष्णा, कोयनाचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. ते दत्त चौकापर्यंत आले होते पण आता ते चार फुटांनी कमी झाले आहे. पूर ओसरत आहे, त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफ़वाला बळी पडू नये असे कराडचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.
कोयना, धोम, या धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात अनुक्रमे कोयना आणि कृष्णा नद्यांमध्ये विसर्ग करावे लागत आहे. पण आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी होवू शकतो. तथापि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्या नंतर अलमट्टी धरणातून सकाळी 6 पासून 4 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे झपाट्याने पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे.
कराड शहरातील दत्त चौकापर्यंत आलेले पाणी सकाळी 9 पर्यंत चार फुटांनी ओसरले आहे. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे कराडचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे यांनी आवाहन केले आहे. काल रात्रीच एन डी आर एफ ची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. जिथे आवश्यकता भासेल तिथे या टीम मधील लोक पाठविले जातील असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.