नगर -नगर जिल्ह्यात त्यातह विशेषत: दक्षिण भागात अतिवृष्टीने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 30 हजार नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे.
या संदर्भात राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांची भेट घेतली. तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशीही मागणी करण्यात आली. भाजपचे जिल्हध्यक्ष अरुण मुंडे, संघटन सचिव प्रसाद ढोकरीकर, सरचिटणीस दिलीप भालसिंग, उपाध्यक्ष शाम पिंपळे, तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे आदी यावेळी उपस्थित होते. दक्षिण भागात रस्त्यांची दुरावस्था झाली असून, त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावेत, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली.
जिल्ह्यात या वर्षी अनेक भागात अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रंचड नुकसान झालेले आहे. बाजरी, कापूस, उडीद, तूर, मूग, सोयाबीन, डाळिंब, संत्री, मोसंबी, केळी, ऊस व फळबागा कोलमडून पडल्या आहेत. त्यात कठीण परीस्थितीतून जात असाताना शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.