मुंबई: चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता आता विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते व माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना फडणवीस यांनी, चंद्रकांत पाटलांचे शिवसेनेबाबतचे विधान देवेंद्र खोडून काढले आहे. ते म्हणतात, ‘चंद्रकांत पाटील शिवसेनेसोबत जे बोलले, ते त्यांनी एका प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं. आम्ही पुढील निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. त्यांच्याकडूनही आम्हाला प्रस्ताव मिळालेला नाही,’
काल भाजपाच्या कार्यकारणीची बैठक घेतली. त्याबद्दलची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. येणाऱ्या काळात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी सांगितलं. त्यामध्ये आम्ही यापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार, निवडणुकीनंतर एकत्र येण्यावर चर्चा होईल. मात्र अद्याप ४ वर्ष आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या बाजूनं प्रस्ताव आला तरी निवडणूक वेगळी लढू, प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व विचार करेल. केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही एकत्रही येऊ,’ असं त्यांनी सांगितलं.
सध्या आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत, कोरोना काळात जो भ्रष्टाचार सरकारनं केला त्याचा बुरखा फाडणार आहोत. ४ महिन्याच्या कालावधीत जे छुप्या पद्धतीने काम केलं आहे, ते माहिती अधिकारातून बाहेर काढू, आंदोलन करू, प्रमुख आणि प्रबळ अपक्ष १९ आणि भाजपा १०५ मिळून विरोधी पक्षाचं काम करू, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.