नगर -पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. यासाठी मानवाचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी मानवाला ऑक्सिजनची अत्यंत गरज असते. मानवाला जीवनामध्ये ऑक्सिजनसाठी दोन झाडांची तरी गरज लागते.
यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावून आपले शरीर निरोगी ठेवावे. तसेच नगर शहर हे हरियाली शहर करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन मनपा विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी केले. वडगाव गुप्ता रस्त्यावरील वैष्णवीनगर येथे जयमातादी ग्रुपच्यावतीने 101 झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सतीष शिंदे, नानासाहेब भंवर, राजेश भंडारी, सचिन पवार, जीवन शिंदे, भाऊ रासने, नितीन बारस्कर, पोपट कटारिया, राजेंद्र पाचे, राहुल मोटे, बापू भोसले, आसाराम वाघ, जगन्नाथ वाघ, अशोक जाधव, निलेश गुगळे आदी उपस्थित होते.
यावेळी भंवर म्हणाले की, झाडे हे मानवी जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. झाडांमुळे आरोग्यबरोबरच त्या परिसराला सुंदरता प्राप्त होते. शासनाने वृक्षांची लागवड करीत असताना विविध संस्थांना व नागरिकांना सोबत घेऊन काम केले पाहिजे. करोना विषाणूच्या संसर्गामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा वृक्षारोपनाचा कार्यक्रम नागरिकांची काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून पार पाडल्याचे ते म्हणाले.