विज्ञानाने निर्माण केलेला पेचप्रसंग सोडविणे प्राप्त
बंगलोर, ता. 2 – विज्ञानाने पेचप्रसंग निर्माण केला आहे. हा पेच सोडवला नाही तर युद्ध किंवा दुष्काळाने तो आपोआपच सुटेल, असे विचार प्रिन्स फिलिप-ड्यूक ऑफ इडींबर्ग यांनी येथे व्यक्त केले. भारतीय विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ड्यूकसाहेब बोलत होते.
ब्रिटिश प्रतिनिधी मंडळाचे वतीने बोलताना ते म्हणाले, शास्त्रीय ज्ञानाची मानवतेशी सांगड घातली पाहिजे. पण शास्त्रज्ञांनाच एकतर्फी दोष देऊन चालणार नाही तसेच शास्त्रज्ञांनीही शोधासंबंधीची आपली जबाबदारी टाळून चालणार नाही. आपण सर्वच एका मानवी कुटुंबांचे घटक आहो. सर्वांनाच सर्वांचे कल्याण अभिप्रेत आहे. मनाचा विकास योग्यरितीने घडविण्याबाबत उपेक्षा होते. औपचारिक विज्ञानशिक्षणाने केवळ मानवतेच्या गरजा कळतीलच असे नाही साहसप्रिय मनाला विशिष्ट प्रकारे शिक्षण-वळण मिळाले पाहिजे.
इंदिरा गांधी कॉंग्रेसच्याअध्यक्ष बनल्या
नवी दिल्ली – श्रीमती इंदिरा गांधी यांची कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे आज जाहीर करण्यात आले. श्री. चव्हाण प्रभृतींनी पाठिंबा देऊन आणि निजलिंगप्पा प्रभृतींना लोकशाही मार्गांनी मागे घ्यावयास लावून इंदिरा गांधी या एकमेव “विरानी’ निवडणुकीच्या रणात राहतील अशी तरतूद करण्यात आल्याने त्या निवडून आल्या.
कृष्ण मेनन यांचा पाकला इशारा
कानपूर – भारत संयम राखतो म्हणून भारत दुबळा आहे असा एखादे राष्ट्रे समज करून घेत असेल, तर तो चुकीचा आहे असा इशारा भारताचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी दिला. ते म्हणाले, आमचे राष्ट्र अलीकडेच स्वतंत्र झाले असले तरी हे प्राचीन राष्ट्र आहे. संयमाची प्रतिष्ठेची परंपरा असलेले राष्ट्र आहे. सर्वांशी स्नेह राखण्याचे आमचे ब्रीद आहे. पण संयम म्हणजे दौर्बल्य असा जरी कुणी श्लेश काढीत असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवावे.