नातरी निदैवाच्या परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ।।59 ।। तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु । कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ।।60 ।। अध्याय नववा
सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात भगवंत आहे, मात्र लोक ते जाणत नाहीत याचे उदाहरण देऊन श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, पण तो तेथे राहून उपवास काढतो म्हणजेच दारिद्य्रात जीवन जगतो. त्याप्रमाणे या शरीररूपी घरात देव आहे; पण दैवहीन मनुष्याला तो दिसत नाही.
ओळखता येत नाही. दुसऱ्या ओवीत ज्ञानोबाराय म्हणतात की, सर्व सुखाचा जणू बगीचा असा जो राम सर्वांच्या हृदयात असताना मला न जानता काही लोक सुखाकरिता विषयांचीच इच्छा करतात.