मागणी अभावी तोड नसल्याने फुले शेतातच फुलली; शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका
उरूळीकांच – करोना व्हायरसचा फटका आता शेती व्यवसायाला बसत असुन शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
शेतकरी वर्गाची “दुभती गाय’ म्हणून गुलछडी या फुल पिकाकडे पाहिले जाते. किंबहुना हमखास आयि खात्रीशिर पैसा मिळवून देणारे पीक म्हणून या पीकाचा उल्लेख शेतकरी करतात. विशेषतः लग्नसराईत गुलछडीच्या फुलांना विशेष मागणी असते. फेब्रुवारी ते मे महिन्यांच्या अखेरपर्यंत या पीकांतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. परंतु, सध्या या फुलांची अवस्था बिकट झाली आहे. बाजारपेठेत पाठवण्यापूर्वी कळी अवस्थेत फुले तोडणे आवश्यक असते. परंतु, मागणी नसल्याने तोड होत नाही यामुळे शेतातच फुले फुलू लागली आहेत. यामुळे फुलांन ाबाजारभाव मिळत नाही. सद्यस्थितीला 50 रुपयांपासून 200 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे.
करोना विषाणूचे संकट जगभरात पसरले आहे. याचा फटका देशाला बसत आहे. यातूनच निर्यातही बंद असल्याने अनेक देशांतून होणारी फुलांची मागणीही कमी झाली आहे. यातून गुलछडीची फुलेही सुटलेली नाहीत. यामुळे स्थानिक तसेच शहर आणि बाहेरील देशांतूनही मागणी नसल्याने गुलछडी फुलांतून होणारी आर्थिक उलाढाल पूर्णत: कोलमडली आहे, यातून शेतकऱ्यांचे आर्थि नुकसान होत आहे.