चांगला पाऊस झाल्यानंतरही उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच स्थिते बिकट
डिंभे -आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवाशी अति दुर्गम भागातील परिसरामध्ये असणाऱ्या व पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे झपाट्याने कोरडे होत आहे.
डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे या वर्षी या भागामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तुडूंब भरून वाहत होते. यामुळे या परिसरातील पाटण, म्हाळूंगे, कुशिरे खु., मंगोली, भेंडारवाडी कोलतावडे ही गावे ओलिताखाली येऊन या भागातील शेतकरी या पाणलोट क्षेत्राखाली उपसा सिंचनाद्वारे मोट्या प्रमाणात रब्बी पिके घेऊ लागली. या पाणलोट क्षेत्रामुळे आदिवासी शेतकरी पाणी उपसा सिंचनाद्वारे गहू, बाजरी, बटाटा, मेथी, कांदा व इतर पिके मोठ्या प्रमाणात घेऊ लागला. आंबेगाव तालुकायच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर भागातील व पाटण खोरे मुसळधार पावसाचे माहेरघर समजले जाते.
पावसाळ्यातील चार महिने या खोऱ्यामद्ये राहणाऱ्या जनतेला सूर्य व चंद्राचेही दर्शन लवकर होत नाही. चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण कारवी लागते. वर्षानुवर्षे लोकांना दुष्काळाचे हाल सोसावे लागतात; परंतु या भागातील मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डिंभे (बाबू गेनू जलाशय) धरणाचा फुगवटा हा मोठया प्रमाणात भरतो. त्याचप्रमाणे या पाणलोट क्षेत्रात अनेक खोऱ्यांमद्ये छोटछोट्या पद्धतीची कोल्हापूर पद्धतीची बंधारे बांधून पाणी अडवले जाते. डोंगर माथ्यावरून येणारे पाणी या बंधाऱ्यात अडवले जाते.
आंबेगाव तालुक्यात एकूण 5500 हेक्टरएवढे एकूण भातक्षेत्र आहे. या क्षेत्रावर तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांचे एकमेव व मुख्य पीक असल्याने भातशेतीच आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाते.
- आदिवासींची मागणी
धरणाचे पाणलोट क्षेत्र हे अनेक खोऱ्यांनी विभागले असले तरी आजही पाटण, बोरघर, आसाने, साकेरी, सावरली, कुशिरे या भागातील आदिवासी गावांना घोटभर पाण्यासाठी वणवण कारवी लागत आहे. घोटभर पाण्यासाठी आजही या भागातील लोकांना दऱ्या-खोऱ्यात खडक टाकीतून किंवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाळमिश्रीत पाणी पिण्यासाठी करावे लागते. यामुळे आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहे.पाणलोट क्षेत्रामुळे आदिवासी जनतेचे जीवनमान उंचावणायसाठी या भागात उपसा जलसिंचन योजना लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी या भागातील आदिवासी जनतेची मागणी आहे