सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : उन्हाचा कडाका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या पश्चिम भागात कडक ऊन पडत आहे. दुपारच्या वेळी तापमान वाढत असल्याने शेतमजूर, मेंढपाळ, ऊसतोड कामगार यांचे असणाऱ्या उष्णतेमुळे लाही लाही होत आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याचे ऊन जाणवत आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर उन्हाचा कडाका वाढत जातो. दुपारी चार वाजेपर्यंत चांगले ऊन जाणवते. त्यामुळे ऊसतोड कामगार ऊस वाहतुकीसाठी वापरत असलेल्या टायर गाड्यांवर उसाच्या वाढ्याचा किंवा घोंगडीचा आडोसा करून सावली तयार करताना दिसत आहेत.