Naseem Khan| लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारीवरून विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यातच काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांनी नसीम खान यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज काँग्रेसच्या नेत्यांनी नसीम खान यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नसीम खान हे नाराज झाल्याची चर्चा होती. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसने अल्पसंख्याकांना एकही उमेदवारी का दिली नाही? असा सवाल त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना केला होता. यानंतर आता त्यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.
नसीम खान काय म्हणाले? Naseem Khan|
“मी पदासाठी काम करत नाही तर काँग्रेस पक्षाच्या विचारधारेसाठी काम करत आहे. तसेच गांधी कुटुंबाच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे. अशीच भूमिका माझी कायम राहिलेली आहे. मी प्रचार समितीचा राजीनामा मागे घेत आहे. सर्व राज्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांनाही माझे आवाहन आहे की, त्यांनी आपले राजीनामे मागे घ्यावेत. पक्षातील वरिष्ठांनी आपल्या भावना समजावून घेतल्या आहेत. मी पक्षातील कार्यकर्ता असून जिथे त्रुटी असेल ती दूर करण्याचं माझं कर्तव्य आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्या मागणीची दखल घेतली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे,” असे नसीम खान यांनी स्पष्ट केले.
“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पक्षाच्या कामाला लागणार आहोत. हा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी मिळून घेतला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराच्या कामाला आम्ही लागणार आहोत. राहुल गांधी देश वाचवण्यासाठी जो लढा देतायेत, त्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. संविधान बदलण्याचा भाजपाचा जो कट आहे. त्याविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी इंडियाचा पंतप्रधान झाला पाहिजे”, असे नसीम खान म्हणाले. Naseem Khan|
हेही वाचा:
बीआरएस नेत्या के. कविता यांना धक्का ; राऊस एव्हेन्यू न्यायालयाने पुन्हा जामीन अर्ज फेटाळला