नगर – केंद्र व राज्याच्या आदेशानुसार लॉकडाऊन तीन मे रोजी उठेल की नाही, याबाबत शंका आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाची आजची परिस्थिती पाहता, नगर जिल्हा 10 मे नंतर ग्रीनझोनमध्ये जाईल. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. कारण करोनावर अद्यापही लस निघालेली नाही, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करोना विषयी व खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आढवा बैठक घेतली. यावेळी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदारांशी सवाद साधला.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात जामखेड, संगमनेर हे दोन तालुके वगळता इतर तालुके करोनामुक्त आहेत. तसेच जिल्ह्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना लवकरच जिल्ह्यात येता येणार
जिल्ह्यात 127 कोटी रुपयांचे कर्जवाटप मनरेगाची कामे सुरु व्हावीत, लोकांच्या हाताला काम द्यावे, खरीप कर्जवाटपाकडे लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यादृष्टीने बॅंकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. यावर, पालकमंत्री मुश्रीफ यांनी, अग्रणी बॅंक अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना त्याबाबत सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 127 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. मात्र त्यांना 14 दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीखाली ठेवले जाणार आहे. आतापर्यंत एक हजार 453 अहवाला पुण्याच्या वैद्यकीय प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 43 करोनाबाधित सापडले होते. त्यापैकी 24 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.