वाघोली (प्रतिनिधी) : कोरोना रोगाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी तसेच जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबीयांची उपासमार होत आहे.
वाघोली मधील अशा जवळपास ३०० कुटुंबीयांना वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र अमृतराव सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, चिराग राजेंद्र सातव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षा पूजा मयूर अडसरे यांनी स्व :खर्चातून भाजीपाल्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.