वंदना बर्वे
सात राज्यांतील राज्यसभेच्या 18 जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीने देशाची राजधानी दिल्लीतील वातावरण तापविले आहे. गुजरातमधील कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात चिंता आहे. कदाचित म्हणूनच, कॉंग्रेसने आपल्या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवले आहे.
जून महिन्याचा हा आठवडा राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे लॉकडाऊनमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता 19 जून रोजी राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणूक होणे आहे. यात गुजरात आणि आंध्र प्रदेश प्रत्येकी चार, मध्य प्रदेश आणि राजस्थान प्रत्येकी तीन, झारखंड दोन आ णि मणिपूर तसेच मेघालय प्रत्येकी एक अशा 18 जागांसाठी ही निवडणूक होणे आहे.
मात्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील 10 जागांवर होणाऱ्या निवडणुकीने अख्ख्या देशाचं लक्ष आपल्याकडे वेधले आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये थेट आमनासामना होणे आहे. भाजपने या तिन्ही राज्यांमध्ये आपल्या क्षमतेपेक्षा एक-एक उमेदवार जास्त उतरविले आहे. यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.
गुजरात
गुजरातमधील तीन जागांसाठी निवडणूक होणे आहे. भाजपचे खासदार चुन्नीभाई गोहेल, शंभूप्रसाद तुंडिया, लालसिंग वडो दिया आणि कॉंग्रेसचे मधुसुदन मिस्त्री हे 9 एप्रिल रोजी निवृत्त झाले होते. निवडणुकीचा तोंडावर कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामे दिले आहे. कर्जनचे आमदार अक्षय पटेल आणि कापरडाचे आमदार जितू चैधरी या कॉंग्रेसच्या दोन्ही आमदारांनी 3 जून रोजी राजीनामे दिले. तर ब्रिजेश मेरजा यांनी 5 जून रोजी आमदारकीचा राजीनामा दिला.
182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत आता भाजपचे 103, कॉंग्रेस 65, राष्ट्रवादी कॉंग्रेस एक, बीटीपी दोन आणि अपक्ष एक अशी 172 सदस्य संख्या आहे. कॉंग्रेसच्या आठ सदस्यांनी अगोदरच राजीनामा दिला होता तर, दोन जागा रिक्त होत्या. सदस्यांना निवडून येण्यासाठी प्रत्येकी 37 मतांची गरज आहे. दुसरी जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला चार मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तर, तिसरी जागा जिंक ण्यासाठी भाजपला फक्त दोन मते कमी आहेत. अशात, सर्वांचे लक्ष बीटीपीचे दोन, राकॉंचे एक आणि एक अपक्ष आमदारांकडे लागले आहे. गुजरातमध्ये भाजप आणि का ँग्रेस प्रत्येकी दोन जागा सहज जिंकू शक तात. मात्र, भाजपने तीन उमेदवार मैदानात उतरविले आहे. नरहरी अमिन हे भाजपचे तिसरे उमेदवार. ते पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसी आहेत. भाजपने अभय भारद्वाज आणि रमीलाबेन बारा यांना तिकीट दिले आहे. तर कॉंग्रेसने शक्तीसिंग गोहिल आणि भरतसिंग सोलंकी यांना तिकीट दिले आहे.
राजस्थान
कॉंग्रेसशासित राजस्थानमध्ये राज्यसभेची होणारी निवडणूक रंगात आली आहे. क ारण, तीन जागांसाठी होणाऱ्या निवडणुक ीसाठी चार उमेदवार मैदानात उतरले आहेत. कॉंग्रेसने के. सी. वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने राजेंद्र गेहलोत आणि ओ. एस. लखावत यांना मैदानात उतरविले आहे. 200 सदस्यांच्या विधानसभेत कॉंग्रेसचे 107 आमदार आहेत. भाजपचे 72 आमदार आहेत. अन्य पक्ष आणि अपक्ष आमदारांची संख्या 21 आहे.
राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी 51 मतांची गरज आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस दोन जागा सहजपणे जिंकू शकते आणि भाजप एका जागेवर विजय मिळवू शकतो. मात्र, भाजपने तिसरा उमेदवार सुद्धा मैदानात उतरविला आहे. यामुळे कॉंग्रेससाठी अडचण निर्माण झाली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे राजस्थानमधून राज्यसभेतील कॉंग्रेसचे एक मेव खासदार आहेत. गेल्या वर्षीच्या पोट निवडणुकीत सिंग निवडून आले होते. भाजपचे मदनलाल सैनी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणे आहे. मात्र, भाजप आणि क ॉंग्रेसने दोन-दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. दोन्ही पक्ष एक जागा सहज जिंकू शकतात. अर्थात, शिंदे आणि दिग्विजय सिंग सहज निवडून येतील. मात्र, तिसऱ्या जागेसाठी भाजपचे सुमेरसिंग सोलंकी आणि कॉंग्रेसचे फुलसिंग बारैय्या यांच्यात आमनासामना होणे आहे. ज्योतिरा दित्य शिंदे यांच्या 22 समर्थकांनी राजीनामा दिल्यामुळे कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. याशिवाय, राज्यसभेची निवडणूक सुद्धा प्रभावित झाली आहे.
मध्य प्रदेशातील 230 सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे 107 आमदार आहेत. तर बहुजन समाज पक्ष दोन, आयएनडी दोन आणि समाजवादी पक्ष एक अशा पाच आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे भाजपची संख्या 112 वर पोहोचली आहे. कॉंग्रेसचे 92 आमदार आहेत तर, 24 जागा रिक्त आहेत. यामुळे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 52 मतांची गरज आहे.
ज्योतिरादित्य शिंदे सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. कॉंग्रेसचे सरकार पाडून आपण चूक तर केली नाही ना, असा प्रश्न त्यांना पडला आहे. याची प्रचिती येते ती त्यांच्या ट्विटर हँडलवरून. कॉंग्रेस सोडण्यापूर्वी त्यांनी ट्विटर हॅंडलवर खास संकेत दिले होते. “कॉंग्रेस लीडर’ हे टॅग काढून टाकलं होतं. आता शिंदे यांनी “बीजेपी लीडर’ हे टॅग काढून “पब्लिक सर्व्हेंट आणि क्रिकेटप्रेमी’ एवढंच वाक्य ठेवलं आहे. भाजपवर त्यांची नाराजी असून लवकरच ते रामराम घेतील अशी चर्चा रंगली आहे.