मुंबई -कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता घाटकोपर मधील दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय भाजपा नेते राम कदम यांनी घेतला आहे. महाराष्ट्रसह मुंबईतील दिवसा गणिक करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्याचं आवाहनही त्यांनी ट्विट च्या माध्यमातून केले आहे.
#corona चे संकट पाहता आणि #दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता #घाटकोपरला होणारी आमची देशातील #सर्वातमोठी #दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे #krishnajanmashtami @ANI @PTI_News @abpmajhatv @zee24taasnews @News18lokmat @JaiMaharashtraN
— Ram Kadam (@ramkadam) June 19, 2020
गर्दी टाळण्यासाठी दहीहंडी रद्दकरण्याचा निर्णय राम कदम यांनी घेतला आहे. राम कदम यांनी ट्विट केले आहे की,’“करोनाचे संकट पाहता आणि दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता, घाटकोपरमघ्ये होणारी आमची देशातील सर्वात मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे, असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.’ दरम्यान,महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूर्वपरिस्थितीमुळे राम कदम यांनी मागील वर्षात दहीहंडी रद्द केली होती.