चेन्नई :- कर्णधार रोहित शर्माच्या भारतीय संघाची एकदिवसीय विश्वचषक मोहीम आजपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतापुढे पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. भारताची फलंदाजी जागतिक दर्जाची असली तरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजीचे आक्रमणही काही कमी नाही.चेन्नईचं कडक ऊन ऑस्ट्रेलियाच्या खेळाङूसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल.
तत्पूर्वी झालला नाणेफेकीचा (TOSS)कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला आहे.(Australia won the toss and elected to bat) कर्णधार पैट कमिंस यानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 12 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने चार सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने आठ सामने जिंकले आहेत. भारतीय भूमीवर वनडे विश्वचषकात दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.
एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघ एकूण 149 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने 56 सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलियाने 83 सामने जिंकले. 10 सामन्यांचा निकाल लागला नाही. दोन्ही संघ भारतात ७० वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 32 सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने 33 सामने जिंकले आहेत. पाच सामन्यांचा निकाल लागला नाही.