छत्तीसगड – मोबाईलचे व्यसन या विषयावर अनेकदा बोलले जाते . मोबाईलच्या व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येते. अशात छत्तीसगडयेथे ‘मिनी नायगारा’ नावाच्या चित्रकोट धबधब्याजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीला तिच्या आई वडिलांनी मोबाईल वापरण्यास मनाई केली म्हणून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच तिला वाचवण्यात आले.
A woman attempted to commit suicide by jumping into #Chitrakoot waterfall of Bastar district, #Chhattisgarh Fortunately, the woman managed to swim back to shore.* ,,, मोबाइल फोन के इस्तेमाल पर परिजनों ने एतराज जताया था, इसपर ये नाराज थी #mobile pic.twitter.com/lxBBvuDjI8
— Abhitosh Singh अभितोष सिंह 🇮🇳 (@abhitoshsingh) July 19, 2023
या घटनेमागचे जे कारण समोर आले ते सर्वच चक्रावून गेले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक नवोदिता पाल यांनी सांगितले की, सरस्वती मौर्य असे २१ वर्षीय तरुणीचे नाव आहे. सरस्वती तिचा जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवत असे. सरस्वतीच्या या सवयीमुळे घरातील लोक त्रस्त झाले होते. यासाठी आई वडिलांनी सरस्वतीला रागावले. आणि मोबाईल कमी वापरण्यास सांगितले.
पोलिसांनी पुढे सांगितले की, वडील संतो मौर्य यांनी मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लेक सरस्वती मौर्याला मोबाईल जास्त वापरल्यामुळे रागावले. त्यामुळे संतापलेल्या सरस्वती चित्रकोट धबधब्यापर्यंत पोहोचली. यावेळी धबधबा पाहण्यासाठी आलेल्या लोकांना ती आत्महत्या करणार असल्याचे समजताच त्यांनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण सरस्वतीने कोणाचेही न ऐकले आणि धबधब्यात उडी घेतली. मात्र, लवकरच तिला आपली चूक लक्षात आली. यानंतर तिने स्वत:ला बुडण्यापासून वाचवण्यासाठी पोहत बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला.
चित्रकोट चौकीचे प्रभारी तमेश्वर चौहान यांनी सांगितले की, धबधब्याजवळ सुरक्षेसाठी तैनात असलेले गावकरी बोट घेऊन सरस्वतीजवळ पोहोचले आणि तिला वाचवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती मौर्य या चित्रकोट गावातील रहिवासी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलगी चित्रकूटमधील एका हॉटेलमध्ये काम करते. गेल्या वर्षीही चित्रकोट धबधब्यात एका मुलीने उडी मारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढली असून, चित्रकोट धबधब्यातही भरपूर पाणी आहे. या धबधब्याची उंची ९० फूट आहे. सुरक्षा यंत्रणेअभावी असे अपघात येथे घडत आहेत.