मुंबई – मुंबईत लांबपल्ल्याच्या गाड्या ज्या सहा रेल्वे स्थानकांवरून सुटतात त्या रेल्वेस्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी त्या स्थानकांवरील प्लॅटफार्म तिकीट विक्री थांबवण्यात आली आहे.
रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या मोठ्या रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफार्म तिकीट विक्री थांबवण्यात आली आहे. या ठाण्यांवर होणारी गर्दी रोखण्यासाठीच ही उपाययोजना करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफार्म तिकिटाचा दर गेल्या काही दिवसांपूर्वीच दहा रुपयांवरून पाच पट वाढवून तो 50 रुपये इतका करण्यात आला आहे. आता मुंबईतील लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी सध्या स्थलांतरित मजुरांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.