नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता सहा हजारच्या जवळ पोहचला आहे. देशात सध्याच्या घडीला 5 हजार 734 च्या घरात कोरोना बाधितांचा आकडा गेला आहे. मागील चोवीस तासात कोरोनाने 17 जणांचा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 166 झाली आहे.
कोरोना तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या 5 हजार 734 जणांमध्ये अद्याप उपचार सुरू असलेले 5 हजार 095 जण, उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले 473 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची 166 ही संख्या समाविष्ट आहे.
Increase of 540 new COVID19 cases and 17 deaths in last 24 hours; India’s total number of #Coronavirus positive cases rise to 5734 (including 5095 active cases, 473 cured/discharged and 166 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/ooymN0Bb7U
— ANI (@ANI) April 9, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या तीन आठवडय़ांच्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिले. शनिवारी, ११ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांनी पुन्हा बैठक बोलावली असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.