मुंबई: मंत्रालयातील काही कर्मचारी सफाई कामगाराच्या संपर्कात आल्याने तिघांना बाधा झाली आहे. संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तीन कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मंत्रालयात आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सफाई कर्मचारी मंत्रालयात दाखल होण्याआधीच योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आले आहे.
राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील उपचार केंद्र असून त्यामध्ये 1 लाख 76 हजार 347 विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे तर अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे. सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. 80 हजाराच्या आसपास पीपीई किटस तर 2 लाख 82 हजार एन मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता करण्यात आली आहे.