पुणे – उन्हाळा सुरु झाला कि बाजारात अनेक हंगामी फळे उपलब्ध होतात. आंबा हे फळ देखील या फळांपैकी एक आहे. फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख आहे. हाच आंबा खाण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता असते. त्यामुळेच आंबाप्रेमी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. भारतामध्ये आंब्याच्या अनेक जाती आढळतात.
लोकांना त्यांच्या आवडीनुसार ते खायला आवडते. काहींना पोपट आंबे आवडतात तर काहींना लंगडा, दसरी, हापूस ह्या जातीचे आंबे खायला आवडतात. परंतु आंबा खरेदी करतांना नैसर्गिक आणि रासयनिकरित्या पिकवलेला आंबा ओळखण्यामध्ये अनेकांचा गोंधळ होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा ओळखायचा कसा? या बद्दलच्या खास टीपा जाणून घेऊयात…
नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा…
नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे चवीला चांगले आणि रसदार असतात. झाडावरून काढलेला कच्चा आंबा नैसर्गिकरित्या पिकविण्यासाठी जरा जास्त कालवधीत लागतो. तसेच या आंब्यांचा रंग हा केशरी असतो. तर हे आंबे थोडेसे कच्चे देखील असतात. तसेच नैसर्गिक रित्या पिकलेलय आंब्यामध्ये जास्त प्रमाणात रस असतो.
रासायनिक रित्या पिकवलेला आंबा…
रासायनिक रित्या आंब्यांवर हिरवे डाग असतात. आंब्यांवरचे हिरवे डाग हे केशरी किंवा पिवळ्या रंगात एकरुप होत नसल्याने ते वेगळे स्पष्ट दिसून येतात. याचप्रमाणे रासायनिकरित्या पिकवलेले आंबे हे नैसर्गिक आंब्यांपेक्षा अधिक पिवळट रंगाचे दिसत असतात. तसेच रासायनिक रित्या पिकवलेला आंब्यामुळे अतिसार, घशात खवखव होणे अश्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते.