मुंबई : कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. चिपळूण आणि महाड येथील पूरस्थितीने रौद्र रुप धारण केले आहे.
हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. त्यातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असल्याने परिस्थिती आणखीन बिकट होत असल्याचे दिसत आहे.
अनेक ठिकाणी पूर आलाय. गावच्या-गावं पुराच्या पाण्यात अडकलीत, अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने जाणार का? असा प्रश्न भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.
चित्र वाघ यांचे ट्विट
‘राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का……खरी गरज आता आहे तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय..’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का……खरी गरज आता आहे
तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय..— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 23, 2021