मुंबई: सोमवारी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी पक्षाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. परंतु विधानसभे नंतर भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘या विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही अशी सरळ विभागणी केली गेली आहे. त्यामुळे कुणाला शंका घेण्यास वाव मिळू नये म्हणून आम्ही लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला. या विधेयकात अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे. तसेच याबाबत जोपर्यंत या विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत मतदान करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra CM Uddhav Thackeray: Anyone who disagrees is a ‘deshdrohi’ is their illusion. We have suggested changes in #CitizenshipAmendmentBill we want in Rajya Sabha. It is an illusion that only BJP cares for the country. pic.twitter.com/pmlenyTX0d
— ANI (@ANI) December 10, 2019
‘लोकसभेत मांडल्या गेलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे या विधेयकाबाबत अधिक माहिती घेतली पाहिजे. जोपर्यंत या विधेयकाबाबत स्पष्टता निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या लोकांने हे विधेयक खरोखरच कळले आहे का, हा पण प्रश्नच आहे. बाहेरून येणारे नागरिक कुठे राहणार, त्यांची जबाबदारी कोण घेणार, हे निश्चित झाले पाहिजे. मात्र शिवसेना कुठल्याही गोष्टीसा आंधळेपणाने विरोध करणार नाही, तसेच कुणाला बरं वाटावं आणि कुणाला वाईट वाटावं म्हणून शिवसेना भूमिका घेत नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: If any citizen is afraid of this Bill than one must clear their doubts. They are our citizens so one must answer their questions too. https://t.co/aB8LQSrmxE
— ANI (@ANI) December 10, 2019
तसेच देशातील जनतेच्या दैनंदिन जीवनावश्यक मुद्यांवर सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज असून, नको त्या प्रश्नांत गुंतवून मुद्दे भरकटवू नयेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.