मुंबई – आज राज्यातील विधान परिषदांच्या निवडणूक निकालानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला.
याच संदर्भात काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
ते पुढे म्हणाले,’माझं तिकीट कापलं असं म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत ते तिकीट आणि व्होट बँक पक्षाची असते असं म्हटलं. तसंच ही व्होट बँक वर्षानुवर्षे मेहनत घेत विकसित करण्यात आलेली असल्याचं सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला,” असं ते म्हणाले.