पुणे – अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामांच्या दर्शनाने जीवन सार्थक झाल्याचे भावनिक उद्गार त्यांनी काढले. अयोध्येतील राममंदीरामधील प्राणप्रतिष्ठानेचा कार्यक्रम दृकश्राव्य कार्यक्रमाचे मृत्यूंजयेश्वर मंदिरात ही या निमित्ताने विशेष नियोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी वर्ग अनिलजी व्यास(संभाजीनगर संघचालक), देवदेवेश्वर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त रमेशजी भागवत, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मंडल सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा. अनुराधा एडके, मंजुश्री खर्डेकर, नवनाथ जाधव,यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर कारसेवक संदीप खर्डेकर, डॉ संदीप बुटाला, मंदिरातील काही श्रमिक बांधव आणि कर्तव्य तत्पर महिला पोलीस अधिकारी तथा दामिनी पथकाच्या कोथरूड पोलीस स्टेशनचे कर्मचारी दामिनी मार्शल अंमलदार श्रुती कढणे,राखी जाधव,वंदना खूमटकर, स्वप्ना पठाडे, अनुष्का जगदाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतजी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
“अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना स्वर्गीय मदनदास देवीजींचे यांचे मार्गदर्शन आणि मोरोपंतजी पिंगळे यांच्या सूचनेनुसार राम जन्मभूमीच्या आंदोलनाशी जोडलो गेलो. यावेळी माझ्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदीजी आणि हरेंद्रकुमार पांडे यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे रामजन्मभूमीशी माझे भावनिक नाते निर्माण झाले आहे.” – चंद्रकांत पाटील ( उच्च व तंत्रशिक्षणमंत्री)