नवी दिल्ली: कोरोना व्हायरस संसर्गाचा सामना करण्यासाठी देशात राबविण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाउन हा आणखी वाढवण्यात येणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. सरकार लॉकडाऊन 90 दिवसांपर्यंत वाढवू शकेल. अशा अफवा येत असल्यामुळे सरकारने यावर स्पष्टीकरण दिले.
कॅबिनेट सचिव राजीव गौबा म्हणाले की, 14 एप्रिलपासून लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही. याशिवाय भारतीय सैन्याने आपत्कालीन घोषणेशी संबंधित व्हायरस संदेशही बनावट घोषित केला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत सेना एप्रिलमध्ये प्रशासनास मदत करण्यासाठी लष्करी एका विशेष योजनेंतर्गत माजी सैनिक आणि एनसीसी कॅडेटची भरती करेल, हे सुद्धा अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
Alert : There are rumours & media reports, claiming that the Government will extend the #Lockdown21 when it expires. The Cabinet Secretary has denied these reports, and stated that they are baseless#PIBFactCheck#lockdownindia #coronaupdatesindia #IndiaFightsCorona
— PIB India 🇮🇳 #StayHome #StaySafe (@PIB_India) March 30, 2020