लखनौ – बसपच्या प्रमुख मायावती यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर होण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्याचवेळी त्यांनी बसपचे संस्थापक कांशीराम यांनाही भारतरत्नने गौरवण्याची मागणी केली.
महान व्यक्तिमत्व असणाऱ्या ठाकूर यांना भारतरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय उशीरा का होईना पण घेण्यात आला. केंद्र सरकारच्या त्या निर्णयाचे मी स्वागत करते, अशी प्रतिक्रिया मायावती यांनी सोशल मीडियावरून दिली. दलितांना आणि उपेक्षितांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी, स्वत:च्या पायांवर उभे करण्यासाठी कांशीराम यांनी मोठे योगदान दिले.
ते ऐतिहासिक आणि अविस्मरणीय आहे. त्यामुळे कांशीराम यांनाही भारतरत्नने सन्मानित केले जावे अशी कोट्यवधी जनतेची इच्छा आहे, असेही त्यांनी म्हटले.