लखनौ – राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. तेलंगणातही आम्ही पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या बाजूनेच वारे वहात आहेत, असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी म्हटले आहे.
पाठक म्हणाले की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही सर्व राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आम्ही (भाजप) जिथे आहोत तिथे प्रचंड बहुमताने सत्तेत येत आहोत. त्यामुळे भाजपा विरोधकांनी आता नव्या धोरणांवर विचार करायला सुरुवात करावी.
सध्या मिझोरामसह पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये मतदान झाले आहे. ३० नोव्हेंबरला तेलंगणात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे.