मुंबई: महाविकास आघाडीत गेल्या काहीदिवसांपासून नाराजी नाट्य सुरु आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तसं बोलूनही दाखवलं आहे. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून काँग्रेसवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला तर राष्ट्रहितासाठी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊन पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन करावं” असा वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.
If Congi and NCP withdraw support from Uddhav government then in the national interest BJP must extend support and re-form NDA govt in Maharashtra
— Subramanian Swamy (@Swamy39) June 18, 2020
सरकार स्थापनेवेळी मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली आणि राज्यत सरकार स्थापन केले, मात्र आता आघाडीत नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्र आपण सत्तेत आहोत, पण निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नाही, असे मत व्यक्त केले होते.