नवी दिल्ली – रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोस्वामी यांच्या अटकेची तुलना भाजपने आणीबाणीसोबत केली आहे. अशातच आता एका भाजप नेत्याने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर आणीबाणी संदर्भात पोस्टर लावले आहे.
भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी चक्क दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी २.० चा लागल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पोस्टर लावले आहे.
दरम्यान, रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.